Tuesday, September 15, 2015

करू समर्थ भारत देश....

जानेवारी १९७० च्या गीतादर्शन अंकात प्रसिद्ध झालेली श्रीराम आठवले यांची ही कविता… 




करू समर्थ भारत देश! ध्रु.

विजयाची गाणी गाऊ 
विभवाची स्वप्ने पाहू 
सुवर्णयुग पुनरपि आणू या - 
होईल साह्य गणेश ! १ 

विज्ञान - कला ही दोन्ही 
वाणिज्य-कृषी ही फिरुनी 
वर्धापन यांचे होत सुनिश्चित 
प्रसन्न जर यत्नेश ! २

विजिगीषु मनि मग आशा 
प्रस्फुरेल पौरुष भाषा 
कीर्ति सुगंधी राहिल पसरत 
यावच्चन्द्र दिनेश ! ३
👆🏻 ऑडिओ



No comments:

Post a Comment