Thursday, July 27, 2017

प्रसाद पुष्पे - क्षण साधा, झडझडून निघा..

प्रसाद पुष्पे - क्षण साधा, झडझडून निघा..

मी हे बोलत आहे ते बरोबर आहे ना?
मी हे करत आहे ते योग्य आहे ना?
असा आपला आपल्याशीच विचार करावा आणि पुढचे पाऊल उचलावे ते माघार न घेण्यासाठीच.
सद्गुरू म्हणजे विवेक! सारासार विचार! सद्गुरु म्हणजेच आत्माराम! सत्कार्याचा प्रेरक!
आपण यासाठीच वारंवार एकांतात बसण्याची, साधना करण्याची नितांत आवश्यकता आहे.
संशय, मत्सर, कुत्सित वृत्ती, हीन अभिरुची, विलासी वृत्ती, विघ्नसंतोषीपणा किती म्हणून गोष्टी सांगाव्यात.
मनात नरक साचलेला असतो आपल्या, छे, छे आपण नरकातच  मुक्काम ठोकून असतो.
पण याची जर आपल्याला जाणीव झाली असेल तर तोच क्षण साधायचा झडझडून निघायचा.
वाल्याचा वाल्मीकी झाला!
अक्षरशत्रू असलेला माणूस कालीमातेच्या उपासनेने महाकवी कालिदास बनला!
अरे मग काय अशक्य आहे आपल्याला?
पश्चाताप होऊन वर्तन सुधारणे चांगलेच. पण पश्चाताप वाटेल असे काही मुळात हातून न घडणे हे अधिकच चांगले नव्हे का?
म्हणून तर श्रीतेमुखी रामायणात कवीने असे म्हटले आहे -
कसे बोलतो, कसे वागतो गोष्ट जरी ही साधी "श्रीरामाला रुचते का हे?" विचार करु या आधी.
शुभस्य शीघ्रम्!
चांगल्या गोष्टीला विलंब कशाला?
उद्या करायचे ते आज! आज करायचे ते आत्ताच!

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले.

No comments:

Post a Comment