पराधीन नाही जगती पुत्र मानवाचा! ध्रु.
झुंज द्यावयाची आहे प्राणपणे येथे
खचायचे नाही कधीहि भान मना येथे
मार्ग जरी काटेरी हा मला चालण्याचा!१
उगाच का कष्टी व्हावे जरी होय हार
एकवटून शक्ती सारी करावा प्रहार
हार जीत यांनी नक्की घोष विक्रमाचा!२
स्वयंनियंत्रण मज रुचते नसे पराधीन
मी न कधी होतो हळवा आणि उदासीन
ध्येय खुणावे मज रस्ता आत्मविकासाचा!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२००४ मधे सकाळ मधे सुप्रभात या सदरामधील खालीलप्रमाणे विचार वाचल्यावर सुचलेली ही कविता.
पराभूत मनोवृत्तीच्या तत्त्वज्ञानाला आळवत बसण्यापेक्षा मूलभूत आणि स्वयंभूतेचे स्वतंत्रतेचे विचार मनात रुजवले पाहिजेत. कोणत्याही घटनेवर आपण नियंत्रण करू शकत नसल्याने पराधीन ठरत नाही. आपण नियंत्रण करतो ते घटनांवर नाही, तर घटनांना आपण जो वैचारिक, नैतिक व भावनिक प्रतिसाद देतो त्यावर. ते विचार व भावना सर्वस्वी स्वयंनियंत्रित व स्वतंत्र असतात. स्वतः मधल्या या नियंत्रक क्षमतेची जाणीव झाली की मन बलशाली आणि निश्चयी होते.
झुंज द्यावयाची आहे प्राणपणे येथे
खचायचे नाही कधीहि भान मना येथे
मार्ग जरी काटेरी हा मला चालण्याचा!१
उगाच का कष्टी व्हावे जरी होय हार
एकवटून शक्ती सारी करावा प्रहार
हार जीत यांनी नक्की घोष विक्रमाचा!२
स्वयंनियंत्रण मज रुचते नसे पराधीन
मी न कधी होतो हळवा आणि उदासीन
ध्येय खुणावे मज रस्ता आत्मविकासाचा!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२००४ मधे सकाळ मधे सुप्रभात या सदरामधील खालीलप्रमाणे विचार वाचल्यावर सुचलेली ही कविता.
पराभूत मनोवृत्तीच्या तत्त्वज्ञानाला आळवत बसण्यापेक्षा मूलभूत आणि स्वयंभूतेचे स्वतंत्रतेचे विचार मनात रुजवले पाहिजेत. कोणत्याही घटनेवर आपण नियंत्रण करू शकत नसल्याने पराधीन ठरत नाही. आपण नियंत्रण करतो ते घटनांवर नाही, तर घटनांना आपण जो वैचारिक, नैतिक व भावनिक प्रतिसाद देतो त्यावर. ते विचार व भावना सर्वस्वी स्वयंनियंत्रित व स्वतंत्र असतात. स्वतः मधल्या या नियंत्रक क्षमतेची जाणीव झाली की मन बलशाली आणि निश्चयी होते.
No comments:
Post a Comment