थांबवू कसा तुम्हाला
चालला महायात्रेला
खळबळ या मानसडोही
पाहिजेच शमवायाला!
आपल्याच छायेखाली
खेळला, वाढला, रमला
हा छत्रपती परि आता
छत्रास पारखा झाला!
पौत्रास मानुनी पुत्र
जाहला तयाची माता
नच मी परि आम्ही अवघे
जाहलो पोरके आता!
आठवे तात अंतरता
निश्चये पद पुढे पडता
तत्क्षणी घालुनी खेव
थांबविले तेव्हा जाता!
सुख सरले, दुःख न उरले
भावना गोठल्या आता
कर्तव्यकर्म मज पुरते
उरलोच स्वराज्यापुरता!
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment