सण दसरा बनुनि काळ शिर्डीला आला
भरदिवसा संतसूर्य अस्ताला गेला!ध्रु.
जन रडती धाई धाई
हाकारती साई साई
पाषाणहि विरहाने अधिक श्याम झाला!१
'मी' 'माझे' ज्या न रुचे
वारस त्या कोण सुचे
प्रश्नाचे उत्तर नच.. प्रलयकाळ आला!२
अज्ञ जना शिकवोनी
दुःखि जना रिझवोनी
तनुत्याग करुनि संत ब्रह्मपदा गेला!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment