Tuesday, December 10, 2019

सागरा तुजसि विनवितो, ने परतुनि भारतभूला

मदनलाल धिंग्राच्या क्रांतीकृत्यानंतर सावरकरांना इंग्लंडमध्ये फार त्रास सहन करावा लागला आणि त्यातच भारतभूच्या विरहाचं दुःख. अशाच एका विषण्ण मनस्थितीत सावरकर ब्रायटनच्या सागरतीरावर उभे होते.  छे एक महाकवी उभा होता.  महाकवीच्या महान अंतःकरणातील भावनांचं आंदोलन महासागराशिवाय कोणाला समजणार? सागराच्या किनाऱ्यावर लाटा उचंबळत होत्या.. आदळत होत्या.. आणि इकडे मनाच्या काठावर देशप्रेमाच्या, स्वातंत्र्य भक्तीच्या लाटा उचंबळत होत्या. 

सावरकरांनी सागराला साद घातली - सागरा तुजसि विनवितो
--------------------------------------

सागरा तुजसि विनवितो,
ने परतुनि भारतभूला!ध्रु.

लाटा किती खळखळ करती
तीरावर येउनि फुटती
बनुनी फेन परतुनि जाती
सागरा प्राण तळमळला!१

मज शब्द एक वदवेना
मातृभूविरह सहवेना
अश्रुसरी या मुळि न थांबती
शोकाग्नि चित्ति भडकविला!२

का निर्दय होउन हसशी?
उद्दामपणे खिजवीशी
तू ऐकले न जर, याच क्षणी-
मी कथिन अगस्ति मुनीला!३

आठव श्रीरामशराते
आठव ऋषि आचमनाते
मत्प्रिय बंधो, करुणासिंधो
चल घेउनि माहेराला!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment