Wednesday, January 1, 2020

मित्रमेळा

प्लेगच्या संकटानंतर सावरकर कुटुंब नाशिकला आलं.
भारतभूच्या स्वातंत्र्याच्या विचारांनी तात्यांना ग्रासलं होतं.

नाशिकला त्यांना आपल्या विचारांचे आबा दरेकर, म्हसकर, पागे हेही मिळाले.  सारा मित्रमेळा जनजागृतीसाठी, स्वातंत्र्यासाठी सिद्ध झाला.

मित्रमेळा?  अभिनव भारताची गंगोत्री होती ती. एका दिलाचे, एका ध्येयाचे मित्र एका सुरात म्हणू लागले..
-------------------------------------

सजला मित्रमेळा! जनजागृतीच्या कार्याला सजला मित्रमेळा!ध्रु.

स्वातंत्र्य हाच ध्यास, स्वातंत्र्य हीच आस
आशा फुलावयाला, सजला मित्रमेळा!१

शिवराय नित्य ध्याऊ, शिवराय नित्य गाऊ
चैतन्य द्यावयाला, सजला मित्रमेळा!२

व्रत घ्यायचे स्वदेशी, भक्ती असो स्वदेशी
स्वत्वास निर्मिण्याला - सजला मित्रमेळा!३

जातीयता सरावी, राष्ट्रीयता भरावी
जनतेस भारण्याला, सजला मित्रमेळा!४

सूचकता साधन अपुले, दास्यमुक्ती साध्यच ठरले
पुरुषार्थ प्रेरण्याला, सजला मित्रमेळा!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(काव्यमय सावरकर दर्शन)

No comments:

Post a Comment