योगी कोण्या एका गावाचे, प्रदेशाचे उरत नाहीत. ते साऱ्या विश्वाचे होतात! त्यांचे मन म्हणजे शुद्ध गंगाजल! वामन देखील असेच साऱ्या विश्वाचे झाले आहेत! "स्थिरचर व्यापुनि दशांगुळे उरला! असेच म्हणावेसे वाटते..
योगी पावन मनाचा!
हा "वामन" सर्व जगाचा!ध्रु.
सुख वसते अंतर्यामी
जा मनुजा रंगुनि नामी
ठसे चित्ती बोध गुरूंचा!१
जे घडते हातुनि कर्म
ते निरासक्त हे मर्म
पथ सोपा चालायाचा!२
नित्य आत्मानंदी दंग
खुलतात जीवनी रंग
आदर्श स्थितप्रज्ञांचा!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
शिवरंजनी (दुर्गा) केरवा
योगी पावन मनाचा!
हा "वामन" सर्व जगाचा!ध्रु.
सुख वसते अंतर्यामी
जा मनुजा रंगुनि नामी
ठसे चित्ती बोध गुरूंचा!१
जे घडते हातुनि कर्म
ते निरासक्त हे मर्म
पथ सोपा चालायाचा!२
नित्य आत्मानंदी दंग
खुलतात जीवनी रंग
आदर्श स्थितप्रज्ञांचा!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
शिवरंजनी (दुर्गा) केरवा
No comments:
Post a Comment