भय सोडुनि दे, मना धीर धर!ध्रु.
देहरक्षणा यत्न केला
तो तो अंती वाया गेला
जाणुनि हे तू रामचरण धर!१
रघुनाथासम स्वामी असता
कसली भीती कसली चिंता?
शाश्वत त्याचा त्वरे ध्यास धर!२
काळ जवळि ये जरि ग्रासाया
सोडवी न तुज पुत्र नि जाया
साहाय्य होईल राम धनुर्धर!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
केदार (हरि तुम हरो जन की भीर)
No comments:
Post a Comment