असता गुरु आधार
विघ्ने निष्प्रभ ती ठरणार!ध्रु.
विघ्ने निष्प्रभ ती ठरणार!ध्रु.
नितांत श्रद्धा सद्गुरुवचनी
तत्पर होता वचनपालनी
भवसागर तरणार!१
कृतीस श्रद्धा पुरवी शक्ती
कृती दृढ करी सद्गुरुभक्ती
शिकवित हे व्यवहार!२
संत सांगती सावध करती
लक्ष ठेविती, ते सांवरती
वात्सल्या ना पार!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज प्रवचन क्रमांक २०५, २३ जुलै वर आधारित काव्य
आधी श्रद्धा, मग कृती, आणि नंतर कृतीच्या फलाचा अनुभव, असा व्यवहाराचा नियम आहे. परमार्थामध्ये आपण त्याच मार्गाने जावे. व्यवहारात तुम्ही एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवता तेवढी जरी भगवंतावर ठेवलीत, तरी भगवंत तुम्हाला खात्रीने समाधान देईल.
आपण परमात्म्याजवळ मागावे की, “ तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव, पण माझे समाधान भंगू देऊ नकोस. माझा मीपणा काढून टाक. तुझा विसर पडू देऊ नकोस. मला अमुक एक तुजजवळ मागावे अशी इच्छा देऊ नकोस. नामामध्ये प्रेम दे, आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे. "
No comments:
Post a Comment