आज महाशिवरात्र. त्यानिमित्त माझ्या वडीलांनी म्हणजे श्रीराम बा. आठवले यांनी लिहिलेले व तरुण भारत मध्ये १९८५ साली प्रसिद्ध झालेले हे सुभाषित.
ओम् नमः शिवाय
कोऽहं प्रश्नोत्तरंलब्धुम्
आत्मानं पश्य मानव।
सोऽहं भावं दृढीकर्तुम्
आह्वयस्व सदा "शिव" ॥
अर्थ
मी कोण? या प्रश्नाचे सम्यक् उत्तर मिळविण्यासाठी मानवा तू अंतर्मुख हो, आत्मनिरीक्षण कर. मी तोच आहे, हा भाव दृढ करण्यासाठी तू नेहमीच "शिव शिव" म्हणत जा.
No comments:
Post a Comment