गण गण गणात बोते !ध्रु.
न पाहिलेल्या शेगांवाला मन जाउन येते ! १
' सिद्धयोगि ' या गजाननाचे दर्शन घरि होते!२
अन्न न वाया जाऊ द्यावे, पूर्णपणे पटते!३
जसा मी तसा बाकी सगळे कळते अन् वळते!४
जितकी भक्ती तितकी प्राप्ती, चिंतन हे स्फुरते!५
देवळात जो, तोच अंतरी हे ध्यानी येते!६
चून भाकरी साधे जेवण देवा आवडते!७
मरण यायचे लांबे परि नच कोणाला टळते!८
रोग मनाचे, ते देहाचे निदान हे सुचते!९
श्रीगजानन, जय गजानन कोणी गुणगुणते!१०
दुसऱ्याचा कर विचार आधी, पोथी हे शिकवते!११
नर नारी हा भेद वरिवरी पोथीतुन कळते!१२
हासत आलो, जाऊ हासत पारायण ठसविते!१३
नका भडकवू कधी वासना संयमि हित असते!१४
अन्न, वस्त्र अन् हवा निवारा रयत हेच मागते!१५
यावे-जावे, खावे-प्यावे प्रेम घरां बांधते!१६
अन्न भुकेला, जळ तृषिताला अमृत हे ठरते!१७
शब्द जोडतो - शब्द तोडतो पोथीतुन कळते!१८
जसे बोलणे - तसे वागणे जाणति हे जाणते!१९
तिथी सप्तमी तिथी पंचमी ओढ मना लागते!२०
हीच उजळणी, दिवेलागणी श्रीरामा पटते!२१
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२१.०९.१९९६