Thursday, May 24, 2012

काय हा उन्हाळा


सध्या खूपच उन्हाळा आहे.  माझ्या वडीलांनी लिहिलेले आणि तरुण भारत मधे १९८५ साली प्रसिद्ध झालेले हे सुभाषित त्यामुळे आठवले.

काय हा उन्हाळा

कुतो निद्रा कुतः स्वास्थ्यं
स्वेदधारा पुनःपुनः ।
विना तापं कथं वर्षा
निदाघाय नमो नमः ॥

अर्थ :

काय हा उन्हाळा..  धड झोप नाही तर स्वस्थता कुठली.  घामाच्या धारा वाहताहेत, पण असा ताप सहन केल्याशिवाय पाऊस कुठला पडायला?  हे उन्हाळ्या तुला पुनपुन्हा नमस्कार.

Friday, May 11, 2012

स्वातंत्र्यसमराचे स्मरण.


१० मे - स्वातंत्र्ययुध्दाचा प्रारंभ.  त्यानिमित्त तरुण भारत मधे १९८४ साली प्रसिद्ध झालेले हे सुभाषित

देशाभिमानः प्रतिकारभाव:
द्वे लक्षणे राष्ट्रभाग्योदयस्य ।
स्वातंत्र्यवीरान् शिरसा प्रणम्य
स्वातंत्र्ययुध्दं प्रथमं स्मरामः ॥

अर्थ :  देशाभिमान आणि अन्यायाचा प्रतिकार करण्याची तीव्र भावना ही राष्ट्राच्या भाग्योदयाची दोन लक्षणे आहेत. सर्व स्वातंत्र्यवीरांना प्रणाम करुन आज पहिल्या स्वातंत्र्यसमराचे स्मरण करु या.

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले