प्रसाद पुष्पे - श्रद्धा!
मानला तर 'देव' नाही तर...... कशाला तो शब्द उच्चारा?
आपण कोणाला आणि काय मानतो ते महत्त्वाचे. मातृदेवो भव। पितृदेवो भव। आचार्य देवो भव।
केवढा सुंदर आणि महत्त्वाचा उपदेश आहे या वचनात. समर्थांचे वचनच पहा ना "यत्न तो देव मानावा".
श्रद्धेशिवाय माणूस मनुष्य असूच शकत नाही. दोन जन्मठेपांची शिक्षा ऐकूनही वीर सावरकर डळमळले नाहीत, अंदमानच्या कारावासात लिहून गेले -
अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला
मारिल मज जगति असा कवण जन्मला?
"न योत्स्ये" असा एकतर्फी निर्णय घेतलेला अर्जुन श्रीकृष्णाला सद्गुरु मानता क्षणी मोह निरसन झाल्यावर म्हणाला - 'करिष्ये वचनं तव।'
पण कोणाचे ऐकायचे? कोणाचे नाही ऐकायचे?
भले बुरे ते आतुनि कळते!
विवेक आत आहे त्या सद्गुरुचेच ऐकावे. द्वाड इंद्रियांचे कधीही ऐकू नये.
श्रद्धा माणसाचे जीवन घडविते. निरार्थकात अर्थ भरून जाते.
कोणी बुद्धिभेद केला नि डळमळली तर ती श्रद्धा कसली?
श्रद्धा हवी प्रल्हादाची! निष्ठा हवी एकलव्याची! मनाची एकाग्रता श्रद्धेमुळे त्वरित होते.
साधना श्रद्धेचे बळ वाढवीत जाते. जशी श्रद्धा तसे आपण! जसे यत्न तसे आपण!
लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले
मानला तर 'देव' नाही तर...... कशाला तो शब्द उच्चारा?
आपण कोणाला आणि काय मानतो ते महत्त्वाचे. मातृदेवो भव। पितृदेवो भव। आचार्य देवो भव।
केवढा सुंदर आणि महत्त्वाचा उपदेश आहे या वचनात. समर्थांचे वचनच पहा ना "यत्न तो देव मानावा".
श्रद्धेशिवाय माणूस मनुष्य असूच शकत नाही. दोन जन्मठेपांची शिक्षा ऐकूनही वीर सावरकर डळमळले नाहीत, अंदमानच्या कारावासात लिहून गेले -
अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला
मारिल मज जगति असा कवण जन्मला?
"न योत्स्ये" असा एकतर्फी निर्णय घेतलेला अर्जुन श्रीकृष्णाला सद्गुरु मानता क्षणी मोह निरसन झाल्यावर म्हणाला - 'करिष्ये वचनं तव।'
पण कोणाचे ऐकायचे? कोणाचे नाही ऐकायचे?
भले बुरे ते आतुनि कळते!
विवेक आत आहे त्या सद्गुरुचेच ऐकावे. द्वाड इंद्रियांचे कधीही ऐकू नये.
श्रद्धा माणसाचे जीवन घडविते. निरार्थकात अर्थ भरून जाते.
कोणी बुद्धिभेद केला नि डळमळली तर ती श्रद्धा कसली?
श्रद्धा हवी प्रल्हादाची! निष्ठा हवी एकलव्याची! मनाची एकाग्रता श्रद्धेमुळे त्वरित होते.
साधना श्रद्धेचे बळ वाढवीत जाते. जशी श्रद्धा तसे आपण! जसे यत्न तसे आपण!
लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले