समर्था स्वीकारा वंदना!ध्रु.
विषयासी आधीच जाणले
सावधपण आचरणी आले
केले पलायना!१
विषयासी आधीच जाणले
सावधपण आचरणी आले
केले पलायना!१
अंतरात या कुठला काम?
माझा दाता एकच राम!
ऐकविले वचना!२
अंगी अपुल्या खरी विरक्ती
मनी उमलली कोमल भक्ती
लाजविले चंदना!३
प्रपंच जैसा काळा फत्तर
त्यातुनि परमार्थाचे अत्तर
काढुनि दिधले जना!४
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ११८ (२७ एप्रिल) वर आधारित काव्य
हुन्नरी लोक निरनिराळ्या वस्तूंमधून अत्तरे काढतात. पण मातीतून अत्तर काढणारा म्हणजे प्रपंचामध्ये परमार्थ करायला शिकवणारा कोणी असेल तर ते समर्थच होत. समर्थांनी विषयाला खरे ओळखले म्हणून "सावधान" म्हटल्या बरोबर ते पळून गेले. समर्थांनी प्रपंची लोकांना तुच्छ केले नाही, परंतु प्रपंचात सुख मिळणार नाही हे सांगितल्याशिवाय ते राहिले नाहीत. उपासना चालवत असता जगण्यासाठी म्हणून भिक्षा मागायला हरकत नाही, दुसऱ्या कशासाठी भिक्षा मागणे पाप आहे. समाजातील ज्या वर्गामध्ये परमार्थाच्या शिकवणीची जरुरी आहे, त्यामध्ये जाऊन त्याला अनुरूप अशी शिकवण देणे हेच प्रत्येक संताचे काम आहे. समर्थांसारखे समतोल वृत्तीचे संत प्रापंचिकांना जास्त उपयोगी असतात.