Thursday, February 16, 2012

दासनवमी

आज दासनवमी. त्यानिमित्त माझ्या वडीलांनी म्हणजे श्रीराम बा. आठवले यांनी लिहिलेले व तरुण भारत मध्ये १९८५ साली प्रसिद्ध झालेले हे सुभाषित.


कदा दासबोधं समग्रं पठित्वा
समर्थानुयायी विवेकी भवेयम्।
बलोपासकोऽहं च भक्त्या विरक्त्यो
कदा रामदासं प्रसन्नं करिष्ये॥

अर्थ
दासबोधाचा चांगला अभ्यास करुन विवेकी असा समर्थानुयायी मी कधी होईन बरे?
बलाची उपासना करणारा मी भक्तीने आणि विरक्तीने समर्थ रामदास स्वामींना कधी प्रसन्न करून घेईन?

No comments:

Post a Comment