Tuesday, July 9, 2013

आषाढस्य प्रथम दिवसे - अर्थात महाकवि कालिदास स्मरण.

आज आषाढाचा पहिला दिवस. १९८४ साली लिहिलेले आणि  तरुण भारत मध्ये छापले गेलेले हे सुभाषित

’आषाढस्य प्रथम दिवसे’ मेघदूतं पठामः
वारंवारं कविकुलगुरुं कालिदास स्मरामः ॥
यस्य प्रज्ञा खलु भगवती, लेखनं भावगर्भम्
नाट्यं, काव्यं मनसि स्वनितं तं कथं विस्मरामः ?

अर्थ :  आज आषाढाचा पहिला दिवस.  चला मेघदूत वाचू.  पुन्हा पुन्हा कवि कुलगुरु कालिदासांचे स्मरण करु.  त्यांची प्रज्ञा खरोखरीच ऐश्वर्यशालिनी आणि लेखन भावसमृद्धच.  कालिदास म्हणताच मनात नाट्य,  काव्य ध्वनित होऊ लागते. त्याला आपण कसे विसरु शकणार. 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment