तो काळ असाही होता तो काळ असाही होता! ध्रु.
त्या स्वतंत्रता समरात
तळपली निमाली ज्योत
लावुनी पणा निजप्राणा ‘वासुदेव’ गेला होता ! १
हे स्वराज्य गेले गेले
हे शल्य अंतरी सलले
भीमासम गट युवकांचा मनि अग्नी फुलवित होता ! २
यत्ना जधि यश न मिळाले
मन क्षणभर हिंपुटि झाले
बलिदान न वाया जाते शिकविते जनांना गीता ! ३
जरि राख चितेची झाली
ठिणगी परि चेतुनि उठली
सातत्या न पडो खंड वाटले असे भगवंता ! ४
या स्वदेशमुक्तीसाठी
क्रांतिचि ध्वजा उंचविती
नरवीर रत्नहारीचा तो ‘कौस्तुभ’ जन्मत होता ! ५
लव धर्म हातुनी झाला
तो कधी न वाया गेला
पार्थास बोधिले कृष्णे उपदेश बिंबला होता ! ६
सामान्य रयत घाबरली
स्वत्वाते मुकली भुलली
दडपवि मन परकी सत्ता तो काळ असा होता ! ७
प्रभु निद्रित होता चित्ती
ओळखही पटली नव्हती
थर जाड जाड विस्मृतिचा हृदयांवर जमला होता ! ८
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले.
त्या स्वतंत्रता समरात
तळपली निमाली ज्योत
लावुनी पणा निजप्राणा ‘वासुदेव’ गेला होता ! १
हे स्वराज्य गेले गेले
हे शल्य अंतरी सलले
भीमासम गट युवकांचा मनि अग्नी फुलवित होता ! २
यत्ना जधि यश न मिळाले
मन क्षणभर हिंपुटि झाले
बलिदान न वाया जाते शिकविते जनांना गीता ! ३
जरि राख चितेची झाली
ठिणगी परि चेतुनि उठली
सातत्या न पडो खंड वाटले असे भगवंता ! ४
या स्वदेशमुक्तीसाठी
क्रांतिचि ध्वजा उंचविती
नरवीर रत्नहारीचा तो ‘कौस्तुभ’ जन्मत होता ! ५
लव धर्म हातुनी झाला
तो कधी न वाया गेला
पार्थास बोधिले कृष्णे उपदेश बिंबला होता ! ६
सामान्य रयत घाबरली
स्वत्वाते मुकली भुलली
दडपवि मन परकी सत्ता तो काळ असा होता ! ७
प्रभु निद्रित होता चित्ती
ओळखही पटली नव्हती
थर जाड जाड विस्मृतिचा हृदयांवर जमला होता ! ८
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले.
No comments:
Post a Comment