मन स्वच्छ स्वच्छ केले
तर रोग दूर गेले!ध्रु.
का भ्यायचे कुणाला, दुखवायचे कुणाला
जर बोल गोड झाले!१
तो वैद्य जीवनाचा श्रीराम अंतरीचा
जर नाम पथ्य झाले!२
ती भूक हीच खूण, घे तूच पारखून
जर अन्न ब्रह्म झाले!३
आनंद घ्यावयाचा, आनंद द्यावयाचा
जर देवघेव चाले!४
चिंता जिवंत जाळे, चिंता जिवास पोळे
निश्चिंत चित्त झाले!५
अभिमान सोडुनीया, पदि भाव ठेवुनीया
मन रामि रंगलेले!६
उपवास चिंतनाला उपवास चालनेला
मन कर्मि गुंतलेले!७
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
तर रोग दूर गेले!ध्रु.
का भ्यायचे कुणाला, दुखवायचे कुणाला
जर बोल गोड झाले!१
तो वैद्य जीवनाचा श्रीराम अंतरीचा
जर नाम पथ्य झाले!२
ती भूक हीच खूण, घे तूच पारखून
जर अन्न ब्रह्म झाले!३
आनंद घ्यावयाचा, आनंद द्यावयाचा
जर देवघेव चाले!४
चिंता जिवंत जाळे, चिंता जिवास पोळे
निश्चिंत चित्त झाले!५
अभिमान सोडुनीया, पदि भाव ठेवुनीया
मन रामि रंगलेले!६
उपवास चिंतनाला उपवास चालनेला
मन कर्मि गुंतलेले!७
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment