नामस्मरणे, नामस्मरणे मन निर्मळ होते
गंगाजळ बनते!ध्रु
गंगाजळ बनते!ध्रु
तम मावळते
सत्त्व उगवते
बुद्धि शुद्ध होते!१
स्वार्थ संपतो
परार्थ सुचतो
"मी तूपण" सरते!२
नाम मला दे
असे जो वदे
त्या शुचिता वरिते!३
रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १२२ (१ मे) वर आधारित काव्य
दुष्ट बुद्धी हा तमोगुणाचा परिणाम आहे. परंतु भगवंताच्या नामाने बुद्धी स्वच्छ करण्याची सोय मनुष्याच्या ठिकाणी आहे. यासाठी पुष्कळ नामस्मरण करावे म्हणजे सत्वगुणाचा उदय होतो आणि बुद्धी शुद्ध बनते. देहाला कष्ट दिले असता भगवंत वश होतो हे काही खरे नाही. भगवंताचे लक्ष आपल्या देहापेक्षा मनाकडे असते. उपवास घडावा याची मौज आहे, ती उपवास करावा यामध्ये नाही. पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा माणसाला भगवंतपासून दूर नेतात पण ज्याचे अनुसंधान मजबूत असते त्याला जगातल्या ऐश्वर्याची किंमत नसते. निष्काम कर्माचे फार फार महत्त्व आहे भगवंतासाठीच भगवंत हवा अशी आपली वृत्ती असावी. प्रत्यक्ष भगवंत समोर उभा ठाकला आणि तुला काय पाहिजे असे त्यांनी विचारले तर, "तुझे नामच मला दे" हे त्याच्याजवळ मागणे याचे नाव निष्कामता होय. जेथे नाम तेथे राम हा ठेवावा विश्वास! कृपा करील रघुनाथ खास..
No comments:
Post a Comment