यत्न सारखा करीत जावा-
यश हे निश्चित येते। ध्रु.
विचार करणे
मन आवरणे
प्रगतिपथी ते नेते!१
श्रवणे मनने
नामस्मरणे
विकारवशता विलया जाते!२
विजनी जावे
मौन धरावे
निर्मत्सर मन होते!३
मृदु बोलावे
जन निववावे
कृतार्थ जीवन होते!४
जे बोलावे
कृतीत यावे
नीतिसंपदा वरते!५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०६.१२.१९७४
समर्थ रामदासांच्या जीवनावर आधारित काव्य.
No comments:
Post a Comment