भक्ताला अंतरंगातील मलीनता तीव्रतेने जाणवत असते. ते निर्मळ होण्यास देवाने साह्य करावे असे त्याला उत्कटतेने वाटते म्हणून तो भाववेगाने म्हणतो..
++++++
गुरुराया, दत्ता ठेविला पदकमली माथा!ध्रु.
आशा बेडी वेगे तोडी
सोडिव सगळी अवघड कोडी
म्हणुन आळवित वेळोवेळी
पूर्णा श्रीमंता!१
मी पण माझे पूर्ण सरु दे
कुवासनांचे वादळ शमु दे
म्हणुनि वाहतो या गीतातुनि
मंत्र -पुष्प-अक्षता!२
वैराग्याची ध्वजा उंचवी
अवजड भारहि तूच पेलवी
चराचरावरि चालतसे नित
गुरो तुझी सत्ता!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(श्री गुरुदेव दत्त)
No comments:
Post a Comment