प्रभात झाली मनी माझिया जाग जाग भारता
भूपाळी तुज गाता गाता प्रसन्नता चित्ता !ध्रु.
भूपाळी तुज गाता गाता प्रसन्नता चित्ता !ध्रु.
नैराश्याचे तिमिर लोपले ध्येयसूर्य उगवतो
कोण मी? करू काय? प्राश्निका सद्गुरु सापडतो
मी देशाचा, भारत माझा लवतो मम माथा!१
स्वराज्य आले बलिदानाने कळत कसे नाही
धनसत्तेचा लोभ अनावर कृतघ्न करू पाही
स्वातंत्र्याचा अर्थ गहनतर ये कोणा सांगता? २
स्वभाव येतो सुधारता हे गीता सांगे मला
वैराग्याने अभ्यासाने पथ मज उलगडला
भारतीय मी हृदयोहृदयी जागविण्या अस्मिता !३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१९.०९.१९८३
No comments:
Post a Comment