मनी जर वासना -विकार
राम कैसा भेटणार?ध्रु.
राम कैसा भेटणार?ध्रु.
नाम का न ये या ओठी?
प्रेम का न दाटे पोटी
कोंडितो अहंकार प्राकार!१
संत सांगती का न रुचे?
उपदेशामृत का न पचे?
अनीति घात खचित करणार?२
नामाचा जादुचा दिवा
सत्संगाचा स्नेह हवा
नसे जर नीतीचा आधार?३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलकर महाराज प्रवचन क्रमांक २४९, ५ सप्टेंबर वर आधारित काव्य.
संतांनी आपल्यावर फार मोठे उपकार करून ठेवले आहेत. त्यांनी नामरूपी जादूचा दिवाच आपल्या हाती दिला आहे; त्यात सत्संगतीचे तेल घातले म्हणजे झाले.
नीतीने वागून जो नामात राहील त्याला नामाचे प्रेम लागल्याशिवाय राहणार नाही. नीती हा सर्वाचा पाया आहे. त्या पायाशिवाय इमारत टिकू शकणार नाही.
No comments:
Post a Comment