भगवंताच्या नामें दुरित नाश पावें!
उठता बसतां सुजन म्हणूनि रामासी गावें!ध्रु.
उठता बसतां सुजन म्हणूनि रामासी गावें!ध्रु.
रामा स्मरणे
तनु विस्मरणे
मिटुनी डोळे घननीळातें प्रेमें देखावे!१
शुद्ध भावना
तीच अर्चना
कल्याणास्तव श्रीरामातें शरण शरण जावे!२
रामा गातां
तया चिकटता
नामाधारे सहज साधके रामा जोडावे!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज प्रवचन क्रमांक २५९, १५ सप्टेंबर वर आधारित काव्य.
भगवंताच्या नामाने सर्व प्रकारच्या दुरितांचा नाश आपोआप होतो.
‘ परमात्मा सर्व करतो ’ ही भावना ठेवायला शिकावे. जिथे नाम आहे त्याच्या आसपास मी घोटाळत राहतो. तुम्ही अखंड नाम घ्या म्हणजे सदा सर्वकाळ माझ्या संगतीचा लाभ घडेल.
No comments:
Post a Comment