Saturday, August 5, 2017

प्रसाद पुष्पे - कधी होशील माणूस?

प्रसाद पुष्पे - कधी होशील माणूस?

मनुष्याचे मनुष्यपण कशात आहे? ते केवळ देहात नाही हे उघडच आहे.

आहारनिद्राभयमैथुनं च  सामान्ययेतत् पशुभि: नराणाम्

माणसाला मन दिलं आहे, त्याला बुद्धीचीही देणगी लाभली आहे देवाकडून.

माणसाने माणसाशी माणुसकीने वागणे हाच खरा धर्म.  जशा आपल्याला भावभावना आहेत तशाच त्या दुसऱ्यालाही आहेत.
'मन कोणाचे कधी न दुखवावे'
जर केवळ विकाराधीन झाला तर मनुष्य पशुत्वाकडे झुकला. त्याने नाशच ओढवून घेतला आणि मनुष्याने विवेकाने आपली क्रिया पालटली, तो संयम शिकला, सदाचारी बनला तर त्याचा प्रवास देवत्वाच्या दिशेने सुरु झाला असे समजावे.

मर्यादित अर्थाने का होईना आपण असे म्हणू शकतो की माणसाला कर्मस्वातंत्र्य आहे.  त्याने अटळ असलेले कर्मच अशा कौशल्याने करावे की ते करताना त्याच्या मनात फलाची अभिलाषा नसावी. कर्तृत्वाचा अभिमान नसावा. समर्पणाची भावना असावी.

सावता माळींनी आपला व्यवसाय कसा केला? जनीने सेवा चाकरी करता करता विठ्ठल कसा आपलासा केला?

जन्माला आल्याचे सार्थक त्यात आहे.

आपल्याकडे आचारभेद असलेले अनेक पंथ आहेत. पण सगळ्यांचा गाभा माणुसकी आहे, प्रेम आहे. वरवर पाहू नये. मनाने आत आत जावे.

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment