Friday, August 25, 2017

प्रसाद पुष्पे - गणरायांचे आगमन

प्रसाद पुष्पे -  गणरायांचे आगमन

आज गणेश चतुर्थी! आज घरोघरी मंगलमूर्ती येणार. श्रींची स्थापना होणार.

तसं पाहिलं तर ही शाडू मातीची मूर्ती.  परंतु भाविक लोक त्या मृण्मय मूर्तीत चैतन्य ओततात. प्राण फुंकताक्षणी ती मूर्ती साक्षात जिवंत होते.

मोठया प्रेमाने आरत्या म्हणायच्या, अथर्वशीर्षाची आवर्तने करायची. दूर्वा वाहायच्या, मोदकांचा नैवेद्य अर्पण करायचा.

गणेशाने केली सूर्याची उपासना! माणसाला माणूस जोडून देऊन त्याचा आत्मविश्वास जागवला. स्त्रियांना स्वसंरक्षण करण्यासाठी समर्थ बनविले.

श्री व्यासमुनी महाभारत सांगत होते, गणपतीने ते स्वतः लिहून काढले.

असुरांचा नाश केला. धर्मध्वज उभारला. मूषकरूपी काळाचे वाहन केले.

जितक्या आनंदाने मूर्ती आणायची तितक्याच आनंदाने गौरींबरोबर तिची पाठवणी करायची.  जलतत्वात पृथ्वीतत्व मिसळले. आकाश आणि तेज या तत्वांच्या साक्षीने. वायू तर आहेच तिथे.

पुन्हा तो अनंत आहेच ज्याच्या त्याच्या आत. जगात पाहुणा म्हणून आलो, पाहुणा म्हणून परतणार. न गुंतता..

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment