जर भक्त जाहला मूल, भगवंतही होतो माता!ध्रु.
मीपणा सकल सोडावा
अनुभवहि आगळा घ्यावा
ओळख मग देवाजीची संजीवन देते चित्ता!१
मन भगवंताच्या ठायी
तन भगवंताच्या पायी
अर्पिली जरी ही सुमने संतोष होय भगवंता!२
निश्चिंत स्मरणि असावे
धैर्याने वागत जावे
देहाचे भान हरपता ये आत्मज्ञानच हाता!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गोंदवलकर महाराज प्रवचन क्र १८९, ७ जुलै वर आधारित काव्य)
No comments:
Post a Comment