जिज्ञासू पार्थाच्या भाषणानंतर भगवान् श्रीकृष्ण मनमोकळे पणाने हसले. सुयोग्य श्रोता मिळाला तेव्हा वक्त्याला आनंद का न वाटावा?
आपण वारंवार या जगात अवतार का घेतो? याचे विवेचन ते करू लागले.
आपण वारंवार या जगात अवतार का घेतो? याचे विवेचन ते करू लागले.
सद्धर्माची स्थापना व्हावी, सज्जनांचे रक्षण व्हावे, दुष्टांचा नाश व्हावा हेच तर भगवंतांनी जन्म घेण्याचे कारण.
भगवान् श्रीकृष्ण अर्जुनाला ममताळू पणाने म्हणाले -
**********
मी अजन्मा, घेत जन्मा याचसाठी अर्जुना!ध्रु.
धर्मबंधन शिथिल होता स्वैरवृत्ती वाढते
धर्म ग्रासू पाहते, दुष्टता ही माजते
राहवेना स्वस्थ मजसी धाव घेतो रक्षणा!१
जन्म ज्या नच मृत्यु कैसा धृष्ट होउनि स्पर्शितो
अज्ञ हे परी काय जाणे बद्ध मजसी मानितो
सज्जना पुढती करूनी देत धर्मा चालना!२
पातकांचे तिमिर जाता पुण्यभास्कर उगवतो
धर्म - नीती जोडि जमता मोद नभि ना मावतो
हेतु माझा दिव्य घडवी नकळता तनुधारणा!३
जे जसे भजती मला मी तसा भजतो तया
भूतमात्रा सदय जे दाखवी मी त्यां दया
धर्मपालन नित्य घडण्या देत राही प्रेरणा!४
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment