विश्वाच्या अंतरी, विश्वाच्या बाहेरी
भरून राहीलो, भरुनि राहिलो!ध्रु.
भरून राहीलो, भरुनि राहिलो!ध्रु.
धरेस तापवी, धरेस निववी
धरेस भिजवी, धरेस सुकवी
सर्व पालटांचे कारण जाहलो!१
उदंड जी रूपे, उदंड जी नामे
वस्तु असंख्यात सर्व माझी धामे
परब्रह्म मीच त्यात कोंदलेलो!२
जळांत, स्थळांत, काष्ठ पाषाणात
दऱ्यांत, खोऱ्यांत, ऊन पावसात
चराचर सृष्टी व्यापुनी उरलो!३
कर्म आड येता, ज्ञान हे न होता
डोळस माणसे पावती अंधता
भ्रमाने तयांच्या ध्यानी नच आलो!४
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१४.०३.१९७४ (पिलू थाट) नीलांबरी केरवा
(हे आतबाहेर मिया कोंदले
जग निखिल माझेचि वोतिले
की कैसे कर्म तया आड आले
जे मीचि नाही म्हणती
या ज्ञानेश्वरीतील ओवीवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक ८१ वर आधारित काव्य).
No comments:
Post a Comment