पाहिजे परमार्थी गुप्तता!ध्रु
जे जे हातुनि घडते साधन
सद्गुरु घेती सगळे करवुन
जाणिव तारत स्वतः!१
भगवंताचे स्मरण प्रतिक्षण
करणे अपुली ओळख होऊन -
छंद हाच चित्ता!२
अन्याच्या नादी न लागणे
धैर्याने पाऊल टाकणे
जमण्या तद्रूपता!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १७० (१८ जून) वर आधारित काव्य.
वासनेच्या तावडीतून सुटणे फार कठीण आहे, वासनेला जिंकणे हे म्हणजे आपण मरून जाण्याइतके कठीण आहे. भगवंताजवळ "वास" ठेवला तरच वासना नष्ट होते. प्रपंचातील वासना बाहेर काढणे याचेच नाव परमार्थ. प्रपंचात प्रसिद्धीची जरुरी वाटते. त्याच्या उलट परमार्थात गुप्ततेची जरुरी लागते. परमार्थात गुप्ततेची गरज आहे. आपले साधन कोणाच्याही नजरेस न येईल अशी खबरदारी घ्यावी, कारण परमार्थाला दृष्ट फार लवकर लागते. आपल्या हातून जे साधन होत आहे ते सद्गुरु किंवा परमात्मा यांच्या कृपेने माझ्याकडून करवून घेतले जात आहे ही जाणीव ठेवावी. परमार्थात भगवंताचे स्मरण ठेवण्याचे काम आपल्या स्वतःलाच करायला पाहिजे, उगीच कोणाच्या नादी लागू नये. कोणाला फसू नका, कारण स्वतः फसणे हे जगाला फसविण्याइतकेच पाप आहे. ज्याचा प्रपंचात पाठीराखा परमात्मा आहे त्याचा तो प्रपंचच परमार्थ होतो.
No comments:
Post a Comment