जय जय रघुवीर समर्थ
हनुमंत धन्य झाला! हनुमंत धन्य झाला!ध्रु.
व्रत ब्रह्मचर्य घेई
सेवेस देह देई
कामास जिंकतो तो, हरिभक्त धन्य झाला!१
याचें मुखांत नाम
बाधे न यास काम
धारिष्ट्य-धैर्य ज्याचें लागे असे पणाला!२
बलवंत, भक्तिवंत
हनुमंत, बुद्धिमंत
तुलना न सापडे हो ज्याच्या जगीं यशाला!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१३.७.१९७४
खालील श्लोकावर आधारित काव्य.
मुखीं राम त्या काम बांधू शकेना।
गुणे इष्ट धारिष्ट त्याचें चुकेना॥
हरीभक्त तो शक्त कामास मारी।
जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी॥
ज्याच्या मुखी राम आहे त्याला काम बाधू शकत नाही. (नामसंकीर्तनाच्या) गुणाने विषयवासनांशी झगडण्यात त्याचें धारिष्टय-धैर्य चळत नाही. हरिभक्त हा मोठा बलिष्ठ असून तो कामास मारतो (जिंकतो) अशा प्रकारचे ब्रह्मचारी मारुतीराय धन्य होत.
No comments:
Post a Comment