जे मन निर्मळ, चोखटे, सुंदर, तेथे वास करी!
मी, तेथे वास करी!ध्रु.
मी, तेथे वास करी!ध्रु.
परदुःखाने दुःखी होते
परसौख्याने जे सुखावते
ते मन मंदिर गमते माते हासत तेथ शिरी!१
चैतन्याशी समरस होता
आत्मरूपता सहज पावता
अनुसंधानी संतत राही ते मन प्रिय भारी!२
ऐसा साधक क्षेत्र होतसे
तीर्थ योग्यता त्यास येतसे
मी संन्यासी त्या क्षेत्रीचा होउनि वास करी!३
झोपेतहि वैराग्य न त्यजते
मनमाहेरी रमते रमते
मम अनुरागी जरी विरागी लावित त्यास उरी!४
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०७.०३.१९७४
(तरी जयाचे चोखटे मानसी
मी होऊन क्षेत्रसंन्यासी
जया निजेलियाते उपासी
वैराग्य गा
या ज्ञानेश्वरीतील ओवीवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक ७४ वर आधारित काव्य).
No comments:
Post a Comment