जय जय रघुवीर समर्थ ॐ
आई गं, चिंता करितो विश्वाची!ध्रु.
चित्तासी या नसे स्वस्थता
ध्यानी रमलो म्हणुनी आता
जाण मग सरली काळाची..!१
तू सांगितले, मिया ऐकिले
निश्चल बसुनी डोळे मिटले
आकृती दिसली तेजाची..!२
खोड्या करणे विसरुनि गेलो
रामरंगि रंगलो, रंगलो
ओढ मज लागत रामाची..!३
प्रभुराया मज मार्ग दाखविल
सहजच सगळा गुंता उकलिल
आस का पुरी न व्हायाची..?४
विस्फारिसि का ऐसे डोळे?
नवल कशाचे तुला वाटले?
लागली गोडी ध्यानाची..!५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०७.०२.१९७४
No comments:
Post a Comment