दुःखाचे हे मूळ, पडला रामाचा विसर!ध्रु.
रामासंगे नाही दुःख
रामावीण नाही सुख
विटत नाही विषया जीव अज्ञानी पामर!१
जे जे धन हाती आले
रामाविण वाया गेले
खरे सुख ते लाभे ना लागे हुरहूर!२
"मी माझे" विसरायाचे
राम दास मज व्हायाचे
जोडताच रामराणा दुःख जात दूर दूर!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १४१ (२० मे) वर आधारित काव्य.
No comments:
Post a Comment