साधनी रमावे, संतरूप व्हावे! ध्रु.
चित्त शुद्ध होता
प्रिय बनू संतां -
नाम नित्य घ्यावे!१
संत ना देहात
संत साधनात
तत्त्व आचरावे!२
करिता अंगीकार
आनंद अपार
देहा विसरावे!२
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १२५ (४ मे) वर आधारित काव्य.
परमार्थास संतांचे अधिष्ठान आवश्यक आहे. चित्त शुद्ध नसेल तर संतांच्या जवळ जाऊन तरी काय उपयोग होणार? संत हे काही देहात नसतात, त्यांना आपण देहात पाहू नये, ते जे काही सांगतात, त्या साधनात ते असतात. आपण जर चित्त शुद्ध करून गेलो तर आपल्याला संतांची भेट होते व भेट झाल्यावर, जे त्रिभुवनातही मिळणार नाही ते ते देतात. ते सांगतील तेच करणे हीच त्यांची खरी सेवा होते. गुरुने एकदा आपल्याला आपले म्हणावे हेच शिष्याला मिळवायचे असते. गुरु आपल्याला निवृत्ती देतात. निवृत्ती दिल्यावर विषयांची प्राप्ती व्हावी ही आठवणच जाते.
No comments:
Post a Comment