Tuesday, September 12, 2017

प्रसाद पुष्पे - मन रिकामं ठेवू नका.

प्रसाद पुष्पे - मन रिकामं ठेवू नका.

मन गढूळ होणे यासारखे दुर्दैव नाही कोणते. का बरे असे व्हावे? आपण ते रिकामे ठेवले म्हणून.

जर आपण कुठले ना कुठले काम सतत करत आलो तर क्षुल्लक गोष्टी बोलायला, ऐकायला वेळच उरणार नाही.

मन जर नामस्मरणाने राममय झाले तर त्याला कौसल्या काय आणि कैकेयी काय दोघीही माताच.

सर्व भांडणांचे, द्वेषाचे मूळ 'मी, माझे' हेच आहे. अविश्वास बोलण्या, वागण्यात व्यक्त होतो. मनात भयगंड निर्माण झाला की आलेच रोग वस्ती करायला.

'मी रामाचा, राम माझा' असा दृढ निश्चय हवा. मनाची ही खंबीरता मनोबोध वाचून मिळते. कोणी कोणाचे भाग्य हिरावून घेऊ शकत नाही.

जो दुसऱ्या साठी खड्डा खणायला जातो तो स्वतः साठीच खड्डा खणतो.

स्वामी समर्थ भक्ताला काय सांगतात?
"भिऊ नकोस! मी तुझ्या पाठीशी आहे!"

- श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment