Friday, September 29, 2017

प्रसाद पुष्पे - नको वासना हेमधामी..

प्रसाद पुष्पे - नको वासना हेमधामी..

जरा फुरसत मिळाली की काय करावेसे वाटते? फक्कडसा चहा प्यावा, सिगारेटचा झुरका घ्यावा, का अजून काही? आतून उसळणारी उर्मी कोणती?

विवेकाने त्या उर्मीवर मात करायची आहे.

मनानेच मनाला शिकवायचे आहे. आयुष्याचा क्षण नि क्षण सार्थकी लावायचा आहे. आपली उपभोगाची लालसा नष्ट करायची आहे. म्हणायचे आहे -
मना वासना वासुदेवी वसू दे!

आजवर स्वतः करताच राब राब राबलो आपण! फार तर अगदी जवळच्या नातेवाईकांचा विचार केला!

विहिरीतल्या बेडकाला जग विहिरीएवढेच वाटते. आपण स्वतःच म्हणू या "कुपातील मी नच मंडूक".

स्वराज्य म्हणजे आत्म्याचे राज्य! रामाचे राज्य! आपला आपण निर्णय घेऊन तसे वागण्याचा पूर्ण अधिकार!

हा अधिकार देवदत्त आहे. मग भगीरथ प्रयत्नाने आपण पूर्वग्रहांवर, विकारांवर मात करू या.

नामस्मरण करून मन शुद्ध करु या. आपले भवितव्य आपण घडवू या. हातून साधना घडू लागली, गीता कळू-वळू लागली म्हणजे आपणच असे म्हणू-

भवितव्य दिव्य माझे माझ्या मुठीत आहे -
झेलावया प्रहारा सामर्थ्य अंगी आहे!

जर जन्म सार्थकी लावायचा असेल तर तटस्थपणे आपणच आपणाला पाहून भावना, विचार आणि त्याद्वारे आचार, सदाचार घडवायचा आहे.

- श्रीराम बाळकृष्ण आठवले.

No comments:

Post a Comment