Sunday, September 17, 2017

प्रसाद पुष्पे - चंद्र सूर्य!

प्रसाद पुष्पे - चंद्र सूर्य!

श्री ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ आणि श्री समर्थ रामदासांचा मनोबोध! एवढे दोन ग्रंथ देखील पाठांतराला, मननाला, जीवनभर जगण्यासाठी प्रेरणा घेण्याला पुरणार आहेत.

हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा
पुण्याची गणना कोण करी?
हे वारंवार मनावर ठसविले जाते.

"भावेविण भक्ती बोलू नये" "हरिसी न भजसी कवण्या गुणे" - असे काही सुटसुटीत चरण बहिर्मुख व्यक्तीला अंतर्मुख करतात.

'मनाचे श्लोक' देखील नास्तिकाला आस्तिक बनविण्यास फार चांगले.

केवळ लहान मुलांनीच पाठ करण्यासाठी नव्हेत तर अगदी शेवटच्या श्वासापर्यंत सगळ्यांनी मनोबोध मोरावळ्यासारखा आवडीने चाखावा, अंगी मुरवावा. धक्के चपेटे सोसण्याचे सामर्थ्य स्वप्रयत्नाने मिळवावे.

सकाळी सकाळी अर्धा पाऊण तास होतील तितके श्लोक म्हणावेत, काही ओळी चिंतनास घ्याव्या आणि भोजनोत्तर निद्रेपूर्वी हरिपाठाची संगत धरावी.

सूर्य चंद्र यांचेच काम हे दोन छोटे ग्रंथ उरलेले आयुष्यभर करीत राहतील असा विश्वास वाटतो.

या दोन्ही ग्रंथांतून गीतादर्शन घडते, नव्हे का?

- श्रीराम बाळकृष्ण आठवले.

No comments:

Post a Comment