ऐसे ज्ञान असावे!
परमार्था पूरक व्हावे! ध्रु.
परमार्था पूरक व्हावे! ध्रु.
प्रेम वाढवी
ऐक्य बाणवी
द्वेषदंभ निपटावे !१
शिकवी नीती
धार्मिकता ती
स्नेहसदन जग व्हावे!२
विवेक कळतो
विकार पळतो
ज्याचे त्या उमगावे!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १७६ (२४ जून) वर आधारित काव्य.
वाचनात आलेले आचरणात आणून जो लोकांना सांगतो तो खरा वक्ता होय. ज्ञान हे मुळात पवित्र आहे. जे ज्ञान नीती आणि धर्म यांच्या पायावर उभे असते ते जास्त प्रभावी ठरते. सर्वांचे एकमेकावर प्रेम वाढेल व सर्वजण एकत्र येतील असे ज्ञान असावे.
द्वेष मत्सर वाढवील, नीतीधर्मास फाटा देईल असे ज्ञान पुस्तकात नसावे. आपल्या मनामध्ये विचार आणि विकार हे दोघेही आहेत. विचार हा पोलीस तर विकार हा चोर आहे. जेथे विचार आहे तेथे विकार राहू शकत नाहीत, पण विकार जर तेथे आलाच तर तो विचारांच्या ताब्यात राहील इतके विचार प्रभावी पाहिजेत.
No comments:
Post a Comment