मी देह नव्हे, मी दुःखि नव्हे-
मन बुद्धि नव्हे, मी मर्त्य नव्हे!ध्रु.
मन बुद्धि नव्हे, मी मर्त्य नव्हे!ध्रु.
देहासक्ती मग कुठली?
विकार-विकृति मग कुठली?
मी भक्त असे, तनुदास नव्हे! १
नामात रहावे आवड ही
देवास पहावे आवड ही
योगीच असे मी भोगि नव्हे!२
,
तो मीचि असे, मी तोचि असे
भगवंती उत्कट भाव वसे
रामाविण क्षण ही भिन्न नव्हे ! ३
तो मीचि असे, मी तोचि असे
भगवंती उत्कट भाव वसे
रामाविण क्षण ही भिन्न नव्हे ! ३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ३५२ (१७ डिसेंबर) वर आधारित काव्य.
मी कोण हे जाणण्यापेक्षा, मी कोण नव्हे हे जाणणे महत्त्वाचे आहे. मनुष्याच्या सर्वसामान्य गुणधर्माचे आकलन जर बरोबर झाले नाही, तर या गुणधर्मावर आधारलेल्या परमार्थाचे मार्गही जाणणे फार कठीण गोष्ट होईल. परमेश्वर आनंदरूप आहे, तो चिरंतन आहे; आपल्या ठिकाणी तो अंशरूपाने असल्याने आपल्यालाही तसे राहणे साहजिकच आवडते. मुळात चूक ही की आपण स्वतःला देह समजूनच राहतो; माझाच देह समजून त्याच्यावर प्रेम करतो ही पहिली चूक. नंतर, या देहाचे गुणधर्म म्हणजे विकार आपल्याला चिकटल्यावर त्यांची जोपासना करतो, ही दुसरी चूक. एकदा हे विकार चिकटल्यावर त्यांची वाढ न थांबविता ते नेतील तिकडे त्यांच्या पाठीमागे जाणे व त्याकरता वेळप्रसंगी आपली बुद्धी गहाण टाकणे, ही तिसरी चूक. नीतिधर्माने वागणे म्हणजे देहाला लागलेल्या विकारांच्या फांद्या तोडण्याप्रमाणेच आहे. दुसरी योजना म्हणजे सगुणभक्तीची. सगुणभक्ती करताना माणूस क्षणभर का होईना स्वतःला विसरतो, आणि "मी तुझा आहे" असे म्हणतो. या नामाच्या सहवासात राहिल्याने देहावरचे प्रेम आपोआप नष्ट होईल आणि मग देहाने मांडलेल्या प्रपंचावरचेही प्रेम कमी होईल. तेव्हा आत्तापासून, मी राहीन तर नामातच राहीन असा निश्चय करा. मला खात्री आहे राम तुमच्यावर कृपा करील.
No comments:
Post a Comment