Saturday, December 28, 2024

नको राग धरूं माझ्या चित्ता!

जय जय रघुवीर समर्थ

मना कोप आरोपणा ते नसावी। 
मना बुद्धि हे साधुसंगी वसावी। 
मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी।
मना होई रे मोक्ष‌भागी विभागी॥


नको राग धरूं माझ्या चित्ता!ध्रु.

हा क्रोध दुःख बहु देतो 
आप्तांसी दुःखित करतो
लुटतसे भक्तिच्या वित्ता!१

सत्संगी बुद्धि रमावी 
आवडी रामि निपजावी 
सर्वत्र प्रभूची सत्ता!२

"तो मी!" हा जाणी बोध 
आवरी आवरी क्रोध 
तर मोक्षचि आला हातां!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१२.१०.१९७४

हे मना, कोपाची आरोपणा- धारणा नसावी (क्रोधवश होऊ नको) (ह्याला एकच उपाय) सत्संगतीतच बुद्धि रमावी. मना चांडाळ - दुष्ट अशांचा संग टाकून दे आणि मोक्षाचा वाटेकरी हो.

No comments:

Post a Comment