जय जय रघुवीर समर्थ
अविद्यागुणे मानवा ऊमजेना ।
भ्रमें चूकलें हीत तें आकळेना ।।
परीक्षेविणे बांधिले दृढ नाणे ।
परी सत्य मिथ्या असे कोण जाणे ॥
भ्रमें चूकलें हीत तें आकळेना ।।
परीक्षेविणे बांधिले दृढ नाणे ।
परी सत्य मिथ्या असे कोण जाणे ॥
वरील श्लोकावर आधारित हे खालील काव्य
उमगत नाही स्वहित माणसा
अज्ञानाच्या मुळे!ध्रु.
भ्रमेच चुकला
स्वहिता मुकला
परमार्थाच्या मार्गावरूनी ढळली मग पाउले!१
परीक्षेविणे
कटीस नाणे
खरे म्हणुनि बांधले तरी का ठरते ते चांगले?२
गुरु न लाभले
येथे अडले
सत्य काय आणि मिथ्या काय न भेद कुणासी कळे!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२६.०३.१९७५
अविद्यागुणे म्हणजे अज्ञानाच्या योगाने मनुष्याला (स्वहित) उमगत नाही. भ्रमाने चुकल्यामुळे आपल्या हिताचे आकलन होत नाही. एखाद्याच्या कमरेला खरे म्हणून परीक्षेशिवाय बांधलेले बद्द नाणे असावे असा हा प्रकार आहे. पण सत्य काय, मिथ्या काय हे कोण जाणतो.
No comments:
Post a Comment