नामसाधनाने जाई अभिमान!ध्रु.
देहबुद्धि जाते
वृत्ति लीन होते
नकळत गळते अवघे "मीपण"!१
नामाचे उदक
अतिव पावक
अंतरंगालागी नाम संजीवन!२
नाम राम घेई
राम क्षेम देई
भक्तिभावे व्हावे रामपदी लीन!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक २८ (२८ जानेवारी) वर आधारित काव्य.
साधन अभिमान घालविण्याकरिता करायचे की वाढविण्याकरिता? अभिमान घालविण्याकरिता म्हणून जे साधन करायचे, त्या साधनाचाच जर तुम्ही अभिमान धरला तर तो तुमचा अभिमान जाईल कसा? आजपर्यंत जे नामस्मरण झाले ते परमात्म्यानेच तुमच्याकडून करवून घेतले व आता तुमच्या हिताकरिताच त्याच्या मनातून तुमच्याकडून करवून घेण्याचे नाही. तुमचे हित त्याला तुमच्यापेक्षा जास्त कळते. नामस्मरण करणारे असे तुम्ही कोण? जे काही होत आहे ते परमात्म्याच्या इच्छेनेच होत आहे. त्यात तुम्ही आपला मीपणा कशाला मिरविता? हा मीपणा, हे कर्तेपण, हे प्रपंचाच्या व परमार्थाच्या जबाबदारीचे ओझे, श्रीसद्गुरूचरणी अर्पण करून खुशाल आपल्या आनंदात मोकळेपणाने का राहात नाही? देहबुद्धी गेली म्हणजे तिच्याबरोबर सर्व कर्मे नष्ट होतात. देहबुद्धी आपल्याला भगवंताचा विसर पाडते. या देहबुद्धीवर आपण नामाच्या मंत्राचे पाणी शिंपडू या, म्हणजे तिची वाढ होणार नाही.
No comments:
Post a Comment