कसेहि घ्या - कुठेहि घ्या
कितीहि घ्या नाम!ध्रु.
कितीहि घ्या नाम!ध्रु.
इंद्रिये मना -
मन मग पवना
जोडत आत्माराम!१
स्वयेच गावे
अन् ऐकावे
मधुर मधुर नाम!२
उठता बसता
जाता येता
घ्या हो अविराम!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०४.०१.१९७९
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ४ (४ जानेवारी) वर आधारित काव्य.
नाम कसे चालेल हे ध्येय ठेवावे; व त्याला मदत होईल व्यत्यय येणार नाही अशा तऱ्हेची कोणतीही बैठक असावी. बैठकीला फार महत्त्व देऊ नये. नामस्मरणात खंड न होईल हे ध्येय ठेवून त्याला अनुकूल अशी ज्याच्या त्याच्या प्रकृतीधर्माप्रमाणे कोणतीही बैठक ठेवावी. वास्तविक नाम कसे घेऊ हे विचारणे म्हणजे पेढा कसा खाऊ म्हणून विचारण्यासारखे आहे. पेढा कोणत्याही बाजूने खाल्ला तरी गोडच लागतो, तसे नाम कसेही घेतले तरी ते आपले काम करतेच करते. नाम कसेही घेतले तरी घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडील. म्हणून कसेही करून नाम घ्यावे.
No comments:
Post a Comment