प्रसाद पुष्पे - समाज पुरुषा तुला प्रणाम.
जर हेतु शुद्ध असेल तर कर्म शुद्ध! मनुष्य कर्मात "मी माझे" मिसळतो आणि आयुष्यच गढूळ होऊन जाते.
वय हे वाढतच असते. कर्मे तर करावीच लागतात. मग ती सेवाभावाने, आनंदाने का करू नयेत? लोकांच्या सहकार्याविना आपले पावलोपावली अडत असते. ही जाण जर आपण मनात बाळगली तर आपण समाजाचे कृतज्ञ राहून आपल्या जीवनात अर्थ भरू शकू.
समाजाने जगात आणले, लहानाचा मोठा केले, संसार थाटून दिला, आजारात शुश्रूषा केली, समाजच शेवटी मूळ ठिकाणी पोचविणार. जनी जनार्दन पहायला शिकू या.
ज्या प्रमाणे जन्मदात्रीचे ऋण कधीच फिटत नसते त्याप्रमाणे व्यक्ती समाजाची सेवा करील तेवढी थोडीच आहे.
व्यक्तीपेक्षा संस्थेचा आयुष्यकाल दीर्घ असतो. जे राव नाही करू शकत ते गाव करून दाखवतो.
एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ!
सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वांमुखी मंगल बोलवावे!
लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले
जर हेतु शुद्ध असेल तर कर्म शुद्ध! मनुष्य कर्मात "मी माझे" मिसळतो आणि आयुष्यच गढूळ होऊन जाते.
वय हे वाढतच असते. कर्मे तर करावीच लागतात. मग ती सेवाभावाने, आनंदाने का करू नयेत? लोकांच्या सहकार्याविना आपले पावलोपावली अडत असते. ही जाण जर आपण मनात बाळगली तर आपण समाजाचे कृतज्ञ राहून आपल्या जीवनात अर्थ भरू शकू.
समाजाने जगात आणले, लहानाचा मोठा केले, संसार थाटून दिला, आजारात शुश्रूषा केली, समाजच शेवटी मूळ ठिकाणी पोचविणार. जनी जनार्दन पहायला शिकू या.
ज्या प्रमाणे जन्मदात्रीचे ऋण कधीच फिटत नसते त्याप्रमाणे व्यक्ती समाजाची सेवा करील तेवढी थोडीच आहे.
व्यक्तीपेक्षा संस्थेचा आयुष्यकाल दीर्घ असतो. जे राव नाही करू शकत ते गाव करून दाखवतो.
एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ!
सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वांमुखी मंगल बोलवावे!
लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment