Thursday, August 17, 2017

प्रसाद पुष्पे - प्रश्न चिंतेने सुटत नाहीत.

प्रसाद पुष्पे - प्रश्न चिंतेने सुटत नाहीत.

सारखी कसली ना कसली चिंता! काळजी! माणसाच्या मनाचा हा स्वभावच निरर्थक काळजी करत बसण्याचा!

आजारपण आले - चिंता! कर्ज फिटेना - चिंता! वरिष्ठ कोपतील - भीती आणि चिंता!

प्रश्न चिंतेने सुटत नाहीत तर चिंतनाने सुटतात. विचारांची देवाणघेवाण व्हावी लागते. आपली तळमळ जगाच्या ध्यानी आणून द्यावी, ज्ञानियाला वाट पुसावी.

प्रपंच आहे रामाचा। हे जाणे तो भाग्याचा!
अंतरि त्यांच्या रंगे राम, श्रीराम जय राम जयजयराम!

भय जावे, निर्भयता यावी, चंचलता जावी स्थिरता यावी, रडवेपणा जावा खिलाडू वृत्ती यावी.

रामनाम हे तनामनाचे रोग बरे करणारे औषध आहे.

समर्थाचिया सेवका वक्र पाहे।
असा सर्व भूमंडळी कोण आहे?

बलोपासना यासाठी, गुणोपासना यासाठी! साधना यासाठी सतत चालू ठेवायची.

गायत्री मंत्र जपायचा, अन्नदान करायचे, ज्ञानदान करायचे.

वेगळे रहायचे नाही समाजाशी समरसून जायचे.

मी तू पण जगन्नाथा होवो एकचि तत्त्वतः।

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले.

No comments:

Post a Comment