प्रसाद पुष्पे - क्षमा! प्रार्थनेचा भाग!
क्षमा मागताना झाल्या चुकीबद्दल मनापासून वाईट वाटले पाहिजे. जिची क्षमा मागायची त्या व्यक्तीच्या मोठेपणाची जाणीव आपल्या शब्दशब्दातून प्रकट झाली पाहिजे.
क्षमा हा आपला अधिकार नाही तर क्षमा करणारी व्यक्ती आपल्यावर अनुग्रह करते अशी धारणा मनात बाळगावी.
क्षमायाचना करून लाभलेली क्षमा ही आपल्याला परिवर्तनाची लाभलेली संधी आहे.
बदल आतून घडलेला असला तरच तो स्थायी स्वरूपाचा, टिकाऊ असतो.
पृथ्वी - धरणीमाता खूप क्षमाशील असते, आपली आई देखील क्षमाशीलच असते. संत स्वभावतःच क्षमाशील असतात.
संत ज्ञानेश्वर म्हणजे तर मूर्तिमंत क्षमा! उगाच नाही त्यांना 'माउली' शब्दांनी हाका मारीत.
हा एकच सद्गुण अंगात बाणला तर माणसाचे आत्मिक बळ कितीतरी पटींनी वाढले असे जाणवेल.
शिवीला प्रतिशिवी हे उत्तर नव्हे. शिव्या ऐकताना मनोमन म्हणावे ज्याच्याजवळ जे असते तेच तर तो देत असतो. आपण त्या घेतल्याच नाहीत की कुठे जातील त्या?
उत्कटतेने मागितलेली क्षमा पुनर्जन्म घडविते.
लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले.
क्षमा मागताना झाल्या चुकीबद्दल मनापासून वाईट वाटले पाहिजे. जिची क्षमा मागायची त्या व्यक्तीच्या मोठेपणाची जाणीव आपल्या शब्दशब्दातून प्रकट झाली पाहिजे.
क्षमा हा आपला अधिकार नाही तर क्षमा करणारी व्यक्ती आपल्यावर अनुग्रह करते अशी धारणा मनात बाळगावी.
क्षमायाचना करून लाभलेली क्षमा ही आपल्याला परिवर्तनाची लाभलेली संधी आहे.
बदल आतून घडलेला असला तरच तो स्थायी स्वरूपाचा, टिकाऊ असतो.
पृथ्वी - धरणीमाता खूप क्षमाशील असते, आपली आई देखील क्षमाशीलच असते. संत स्वभावतःच क्षमाशील असतात.
संत ज्ञानेश्वर म्हणजे तर मूर्तिमंत क्षमा! उगाच नाही त्यांना 'माउली' शब्दांनी हाका मारीत.
हा एकच सद्गुण अंगात बाणला तर माणसाचे आत्मिक बळ कितीतरी पटींनी वाढले असे जाणवेल.
शिवीला प्रतिशिवी हे उत्तर नव्हे. शिव्या ऐकताना मनोमन म्हणावे ज्याच्याजवळ जे असते तेच तर तो देत असतो. आपण त्या घेतल्याच नाहीत की कुठे जातील त्या?
उत्कटतेने मागितलेली क्षमा पुनर्जन्म घडविते.
लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले.
No comments:
Post a Comment