प्रसाद पुष्पे - काय होईल? कसे होईल?
भीतियुक्त चिंता किंवा चिंतायुक्त भीती! का असे होते? माणसाचे मन त्याच्या देहाच्या सुख दुःखांशी अगदी जखडून बांधले गेले. 'मी देहच आहे' असा दृढ समज माणसाने करून घेतला आणि माणूस परतंत्रच झाला. वासनांचा गुलाम! समर्थांना अशा बिचाऱ्या माणसांची कीव येते. ते तर म्हणतात.
मनी मानव व्यर्थ चिंता वाहाते
अकस्मात होणार होऊनि जाते
मन खंबीर बनले पाहिजे. जे काही बरं वाईट घडेल ते रामाच्या इच्छेनेच घडणार. शाश्वताचा बरा निश्चय झाला की कोणी अशाश्वतासाठी रडणार नाही, झुरणार नाही.
मी देह नव्हे! मला जन्म नाही, मरण नाही. सुख नाही दुःख पण नाही.
चिदानंद रूप: शिवोsहम् शिवोs हम्
ही आद्य शंकराचार्यांची शिकवण ध्यानी घेऊ या, अंगी मुरवू या.
लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले
भीतियुक्त चिंता किंवा चिंतायुक्त भीती! का असे होते? माणसाचे मन त्याच्या देहाच्या सुख दुःखांशी अगदी जखडून बांधले गेले. 'मी देहच आहे' असा दृढ समज माणसाने करून घेतला आणि माणूस परतंत्रच झाला. वासनांचा गुलाम! समर्थांना अशा बिचाऱ्या माणसांची कीव येते. ते तर म्हणतात.
मनी मानव व्यर्थ चिंता वाहाते
अकस्मात होणार होऊनि जाते
मन खंबीर बनले पाहिजे. जे काही बरं वाईट घडेल ते रामाच्या इच्छेनेच घडणार. शाश्वताचा बरा निश्चय झाला की कोणी अशाश्वतासाठी रडणार नाही, झुरणार नाही.
मी देह नव्हे! मला जन्म नाही, मरण नाही. सुख नाही दुःख पण नाही.
चिदानंद रूप: शिवोsहम् शिवोs हम्
ही आद्य शंकराचार्यांची शिकवण ध्यानी घेऊ या, अंगी मुरवू या.
लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment