अर्जुना संमोहें ग्रासलें! ध्रु.
निजदेहासी म्हटलें अर्जुन
परदेहांसी म्हटले स्वजन
युद्ध मग पापकर्म बाटले!१
मी देहाहुनि असे वेगळा
परमात्मा तो परम सोवळा
ज्ञान हे, अज्ञानें झांकले!२
धर्माधर्म कळेना कांहीं
बुडुनी गेला मग संदेही
दैन्य हैं केवळ भ्रांतीमुळे!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०८.१२.१९७४
स्वदेहा नाम अर्जुनु ।
परदेहा नाम स्वजनु ।
संग्रामा नाम मलिनु ।
पापाचारु । [ १८ : १२७९ ]
या ज्ञानेश्वरीतील ओवीवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक १८९ वर आधारित काव्य.
No comments:
Post a Comment